मुंबई : काल औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे होते. आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील नंदुरबार जिल्ह्यात एकाच व्यासपिठावर आहेत… त्या पोठोपाठ आता उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एकाच व्यासपिठावर दिसलेत. राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय…? असा प्रश्न निर्माण करणारी ही वस्तूस्थिती आज दिसतेय. त्यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा सर्वच पक्षांचे कार्यकर्ते चक्रावलेत. कार्यकर्त्यांना टेबल टेनीसच्या चेंडू प्रमाणे इकडे तिकडे पहावं लागतंय, अशी भावना निर्माण करणारं चित्र सध्या राज्याच्या राजकारणात पहायला मिळतंय.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.